Friday, September 15, 2006

marathinagari
थोडा विचार करा!एक माणूस आपले जीवन त्याच्या पद्धतीने जगत होता. धार्मीक वृत्तीचा होता.काही वर्षांनंतर त्याचे निधन झाले.त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.त्याला थेट स्वर्गात जागा मिळाली होती.त्याने विचार केला की योग्यच झाले, माझ्या धार्मीक राहणी मानाचे मला योग्य बक्षीस परमेश्वराने दिले.काही महिन्यांनंतर त्याच्या शेजाऱ्यालाही स्वर्गात पाहून तो थोडासा गडबडला.विचार करू लागला की माझे एक ठीक आहे, पण माझ्या शेजाऱ्याने तर कधीही देवाला नमस्कार देखील केला नाही, कधी देवळात गेला नाही, मग ह्याला परमेश्वराने इथे कशी काय "एन्ट्री" दिली?काही दिवस तो गप्प राहिला, पण अखेर त्याला राहवेना.परमेश्वराला शेवटी त्याने तसे विचारलेच.
परमेश्वर म्हणाला, खरे म्हणजे मी चूकच केली, पण माझा स्वभाव अत्यंत दयाळू असल्याने मी तुलाइथे - स्वर्गात जागा दिली. तू माझ्याकडे सतत काहीना काही मागणी करत होतास, कधी मला पॆसा दे,कधी चांगले आरोग्य दे, कधी काही कधी काही सतत तुझी मागणी असेच. खूप त्रास दिलास मला.पण तुझा शेजारी पाहा, ह्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात माझ्या जवळ काहीच मागितले नाही, मला काहीही त्रास दिला नाही, मी त्याला थेट इथे स्वर्गात घेऊन आलो......

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home